Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांचा निधी ग्रामपंचायतींनी वाटप करावा ; दिव्यांग संघटनांची मागणी

किनवट,दि.२२ : ग्रामपंचायती अंतर्गत वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो; परंतु, काही ग्रामपंचायतींकडून पाच टक्के निधी अद्याप वाटप झालेला नाही.तो त्वरीत  वाटप करण्यात यावा, अशी मागणी सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व प्रहार दिव्यांग क्रांती  संघटनेचे अध्यक्ष भगवान मारपवार यांनी केली आहे.
   ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो; परंतु, काही ग्रामपंचायतींकडून अद्याप पाच टक्के निधी वाटप झालेला नाही, तर काही ठिकाणी ग्रामसेवकांकडे वार्षिक उत्पन्नाची विचारणा केली असता, समाधानकारक माहिती मिळाली नाही, तसेच वार्षिक उत्पन्नाच्या कोणता कागदोपत्री लेखाजोखा दाखविण्यात आला नाही. ज्या ग्रामसेवकांनी निधी खर्च केला नाही अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही सर्पे व मारपवार यांनी केली आहे. पाच टक्के निधी खर्च केला नाही, तर दिव्यांग संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच शासनाच्या घरकुल योजनेत दिव्यांग बांधवांना समाविष्ट करण्यात यावे व दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचे फलक ग्रामपंचायतीत दर्शनी भागात लावण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.
  || काही ग्रामपंचायतचे उत्पन्न  लाखामध्ये असूनसुद्धा ग्रामसेवकांकडून ग्रामपंचायतीचे उत्पन्न तोंडी कमी सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी प्राप्त होत नाहीय. बंद लिफाफ्यात तीनशे, पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाटप करून दिव्यांगांची चेष्टा करण्यात येत आहे.||
- भगवान मारपवार, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, 

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त