नांदेड : डॉ.कॉ.अण्णाभाऊ साठे हे जागतिक किर्तीचे साहित्यिक असून मुबंई महाराष्ट्रात राहावी म्हणून संयुक्त महाष्ट्राच्या चळवळीत पुढाकार घेऊन अग्रस्थानी होते.त्यांच्या मुळेच आज मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.त्यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहन मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या संचाने झेंड्याला माणवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष माननीय मारोती वाडेकर होते उदघाटक नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रा. रवींद्र पाटील चव्हाण आणि स्वागताध्यक्ष ऍड. सुरेंद्रजी घोडजकर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण चे काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील बेटमोगरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, शमीम अब्दुल्ला, प्रफुल सावंत, प्रा. माधव बसवंते, आनंद जाधव, संजय मोरे, विजय रणखांब, प्रा. संभाजी बिरंजे, यांच्यासाह
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले व केशव शेकापूरकर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. गणेश अण्णा तादलापूरकर यांनी केले.
प्रमुख उपस्थिती मा. आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेब.
यावेळी खासदार साहेबांच्या हस्ते
समाजभूषण पुरस्कृत चालवळीचे नेते मा. राजाभाई सूर्यवंशी मा. रामचंद्र भरांडे मा.गंगाधर वाघमारे, मा. आर. जे. वाघमारे मा. कैलास गायकवाड, सौ.सुमनताई जिरोणेकर मा. मल्हारराव तोटरे तसेच गुणवंत विध्यार्त्यांचा सत्कार करण्यात आला
प्रमुख अतिथी गंगाधर कावडे, नारायण कोळंबीकर, गंगाधर वाघमारे, श्याम कांबळे, प्रा. डॉ.माधव बसवंते,कॉ. उज्वला पडलवार, कॉ. गंगाधर गायकवाड,
या कार्यक्रमासाठी जिल्हा जयंती मंडळाने अतिशय मेहनत घेऊन यशस्वी केले.
संयोजक गणेश अण्णा तादलापूरकर अध्यक्ष नागेश तादलापूर, उपाध्यक्ष अंबादास भंडारे, मारोती चिवळीकर सचिव ईश्वर अण्णा जाधव सल्लागार प्रा. देविदास इंगळे, सुनील कुमार मोघेकर, वांगीकर,कॉ. गंगाधर गायकवाड,रोहन वाघमारे,बंटी कांबळे,विजय गायकवाड, कदम आदिनी मेहनत घेवून यशस्वी केला.
या कार्यक्रमाला ग्रामीण भागातून व शहारी भागातून हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते.
त्यांनी लोकशाहीरीच्या माध्यमातून समाजात जनजागृती केली म्हूणन थोर साहित्यरत्न यांच्या जन्मदिनी संबंध महाराष्टात 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी. प्रतिवर्षी प्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ वी जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक जयंती मंडळ स्थापन करण्यात आली आहेत.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मातंग समाज वस्तीत व तसेच शहरातील विविध भागात सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम, अभिवादन कार्यक्रम, आरोग्य शिबिरे इत्यादी समाजोपयोगी सामाजिक उपक्रम कार्यक्रम राबवून जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजनकरण्यात येते.
जयंती महोत्सव निमित्त शहरी भागात व प्रामुख्याने ग्रामीण भागातील मातंग समाजातील लोक वस्तीत होणाऱ्या अभिवादन कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, प्रबोधनपर कार्यक्रम, आयोजित असतात पण थोर महामानव यांच्या जयंती दिनी जर दारू ची दुकाने चालू असल्यामुळे नांदेड मधील गुन्हेगारी चे प्रमाण पाहता काहीही अनुचित प्रकार जयंती दिनी घडू शकतात .
नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देवून मागणी करण्यात आली.
या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे जिल्हा जयंती मंडळ नांदेड चे संयोजक मा. गणेश अण्णा तादलापूरकर उपाध्यक्ष मा. मारुती चिवळीकर, उपाध्यक्ष अंबादास भंडारे, सचिव राजू जाधव उर्फ ईश्वरांना जाधव सल्लागार प्रा. देविदास इंगळे, सुनील कुमार मोघेकर, गणपत रेड्डी, सुरेश तारू वांगीकर, संजय गायकवाड, दिगंबर घायाळे,सतीश डोंम्पले, सोनू रेड्डी, भगवान जाधव, साई जाधव,खंडू वाघमारे, दत्ता गायकवाड,बबन संपते आदी मान्यवर उपस्थित होते.